Tuesday, December 2, 2008

देश पेटला! आपण कधी पेटणार? की नुसतेच 'पेटवणार'?

दिनांक २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये जो गोळीबार व हल्ला सुरु झाला तो सतत ३ दिवसपर्यंत चालू राहिला. देशावर हा एक मोठा हल्ला होता. दहशतवादी हल्ला होता की नाही हे येणारा काळच सांगेल. कारण जूनपासून सातत्याने चालू असणाऱ्या इतक्या हल्ल्यांची दहशत आपल्याला (भारतीयांना) अजून बसली नाही; म्हणूनच की काय हा भयंकर संहार झाला.
देशातील जनमत आता प्रचंड प्रमाणात भडकले आहे. आणि आपले मंत्री नुसते राजीनामे देत सुटले आहेत. आपण इतके "पेटलो" आहोत की जिकडे संधी मिळेल तिकडे आपण आपला असंतोष प्रकट करत सुटलो आहोत. आणि वृत्तवाहिन्या, वाचकांची पत्रे, आकाशवाणी ; जिकडे तिकडे मंत्र्यांची (त्यांना खरंच देशाचे ‘नेते’ म्हणवत नाही) छी: थू चालू आहे. पण हे एक बरं झालं. या हल्ल्यांमुळे बॉम्बस्फोटांचा आवाज या देशातल्या ‘नागरिकांना’ ऐकू तरी आला.
पण मित्रांनो हा असंतोष तसाच धगधगत राहूदे. आज एकदा असंतोष प्रकट केलात की उद्या पुन्हा आहेच आपलं रोजचं रहाटगाडगं! तेव्हा वापरा थोडा असंतोष! १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला नियमितपणे, काहीही झालं तरी, मी माझ्या देशासाठी ध्वजवंदनाला गेलं पाहिजे. रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी त्या त्या नियमांनुसारच वागायला हवं , मग कोणतीही सबब चालणार नाही. म्हणजे एखाद्या वेळी नियम तोडलात आणि पकडले पोलीसाने, की दंड भरताना संकोच कसला ? राग कसला? तो पोलीस त्या लायकीचा नाही, तो पैसे खातो इ. इ.! म्हणून मी चुकलो ते बरोबर ठरत नाही. आणि मला सांगा तुम्ही तिथे पोलीस असतात तर काय केलं असतं? चालूद्या हो, हे असंच चालणार ; असं म्हणू नका. देशाची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला आहे. ती वापरायला लागू आता! केवळ यंत्रणेतले (system मधले )दोष दाखवण्यापेक्षा आधी स्वत: ८०% वेळा तरी; ‘देशा’साठी म्हणून नियमांचं भान ठेवून वागूया.
दरवेळेला गरीबी ,असहायता म्हणून सहानुभूती कशाला? adjustment, compromise यांचा अतिरेक झाला म्हणूनच देशावर हा हल्ला होऊ शकला। बहुसंख्येसाठी (Quantity साठी ) गुणवत्तेचा (Quality)चा बळी कशाला ? ही सर्वोत्कृष्टतेची मागणी मीच करणार नाही तर कोण करणार? आणि इतरांशी तुलना कशाला? माझा सर्वोत्कृष्ट व्हायला हवा त्यासाठी "त्या देशात तसं असतं, हा देश इतका छोटा ,इतका उद्ध्वस्त झालेला, तरी त्याची प्रगती बघा", म्हणून इथे असं हवं; असं का म्हणायचं? "आपला देश महासत्ता व्हायला हवा"; बास ! यातच आलं सगळं। इतकं पेटायला हवं. शेवटी व्यावहारिक जगात तुलना आहेच की; पण ती केवळ व्यवहारापुरती असू द्यावी. प्रथम क्रमांकाला परिमाण प्रथम क्रमांकाचंच असतं अशी जिद्द, असा अट्टहास हवा.
आणखी एक म्हणजे, नको तितक्या सहानुभूतीचा आता त्याग करायला हवा. नको तिथे दया-माया उपयोगाची नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा पराभव अनुल्लेखाने करता येत नाही. हे सगळ्यांनी नुसतं समजून उपयोगी नाही, जिथे शक्य तिथे पटवून द्यायला हवं. या विचारसरणीचा पगडा जनमानसात बसायला हवा नव्हे बसवायला हवा. आणि कायमचं लक्षात ठेवायला हवं.
हा लेख वाचणारे निदान ‘e-साक्षर’ तरी आहेतच. लक्षात ठेवा; शहाणी माणसं गप्प बसतात म्हणून सगळं बिघडतं, मूर्खांमुळे नाही. अक्कलहुशारीने आणि मुत्सद्दीपणाने आपले मुद्दे ज्यांना कमी कळतं, जे पटकन अविचाराने भडकून उठतात; अशांना पटवूया. एवढ्या मोठ्या हल्ल्यांनंतरही आपण, स्वत:ला शहाणे म्हणवणाऱ्यांनीच, जर बदल घडवला नाही तर कोण घडवणार. दहशतवाद्यांनाच दहशत बसेल असा देश तयार करण्यात आपण आपला खारीचा वाटा तरी उचलूया!

पेटते राहूया!
http://www.loksatta.com/daily/20081202/edt.htm
http://www.esakal.com/esakal/12022008/Sampadakiya83E73329AB.htm

3 comments:

  1. "लक्षात ठेवा; शहाणी माणसं गप्प बसतात म्हणून सगळं बिघडतं, मूर्खांमुळे नाही. अक्कलहुशारीने आणि मुत्सद्दीपणाने आपले मुद्दे ज्यांना कमी कळतं, जे पटकन अविचाराने भडकून उठतात; अशांना पटवूया"

    1.What is the action plan expected from their side?

    2.It does not take logical reasoning or wit to convince the mob, all that is
    required there is nothing but cliches and applauds, which politicians are expert
    at... (But as you are well aware, they are wasting their talent for personal
    mean goals like chair/power/votes.) And who elects them? We???? No, not even us... votebanks do... But agreed, there are silent "shahaani(?) mansa" like you and me, who do want to see the change... But then, whats the remedy? Get into politics??? You know, not everybody can do that. Unfortunately, as despiteful as terrorist's goals and means/ways are, (and though we are as noble in terms of ideologies, logical view etc), they are pretty clear about their pathways, whereas we are perfectly lost. The whole sstem needs to change from grassroot level and I
    am unable to figure out what can I do about it? Sad but true, we are lost!

    I don't mean to be to pessimistic here, but all that I am asking for is definitive action plan. And yes, even I can think of few, (basically
    making rules and regulations more stringent, make people surrender to real civic sense,) all of which basically would require initiative from
    government level, and that is where the real roadblock is!

    GOOD ARTICLE nonetheless! :)

    ReplyDelete
  2. Definitely this is different reaction!!!!
    This is the reaction of a citizen who wants to take firm actions and also wants to participate in those!
    It's definitely true that WE PEOPLE should stop talking from the fence and take part in the game!
    I will not say that i am impressed by your blog but i will say that i am definitely MOTIVATED!

    ReplyDelete
  3. 1. Very apt title.
    2. Charity begins at home! Well said, Mak!
    3. Wise folks truly bear more responsibility in such circumstances. I do agree...

    BUT, I don't agree much with 'quality at the expense of quantity' argument! Truly, it has manifold repercussions....those need a separate topic!
    Btw, keep it up, Mak!
    Happy blogging!

    ReplyDelete