Tuesday, December 24, 2013

सिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे !

(गदिमा व बाबूजी क्षमस्व मां)

सिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे  !
सिग्नल तोडा रे झडकरी ! सिग्नल तोडा रे झडकरी !सिग्नल तोडा रे झडकरी !
||पुणेरी ट्रॅफिक की हो जय ||

पी एम पी च्या गाड्या पळती,
गजांग! तरीही पुढे निसटती
फिकीर नाही अवती-भवती
कोणी असे वा नसे काय ते , चला चला सत्वरी !

कसला पिवळा, लालही कसला
थांबे जो - तो तिथेच फसला
चौका मध्ये घुसूया चला
अर्जंटाची इमर्जन्सी ही असेच हो न्यारी !!

वाहन गर्दी अशीच जमता
इंच इंच ते पुढे सरकता
पायी चालल्या पथिकाकरिता
जागा नुरली कशास यावे त्याने रस्त्यावरी !

बाईक येथे सहज लाभली
कोटी कोटी "धूम" उपजली
कुठला वन-वे शिस्तही कुठली ?
नियमावली पाळायासाठी जावा नगरांतरी !!

मामाने जरी मध्ये पकडता
चिरीमिरी द्या, घ्या पाय काढता
सावधान हो! पार्किंग करता !
त्या गुन्ह्याते , फटका मोठा चारशे - पाचशे वरी !!

गर्जा गर्जा हे पुणेरीगण
भाई दादा सगळे आपण
सगळे आपण भलते सज्जन !!
अक्कल नसते केवळ येथे इतरांच्या हो शिरी !!

बाणा असतो खास पुण्याचा
विशाल हेतू याच कलेचा
महिमा कळतो मग स्पर्धेचा
पाहती मग उल्लंघ-कार्य हे स्तब्ध दिशा चारी !!


धुरासोबती पिटवा डंका (बर का ! बर का !! बर का !!!)
पुणेकराचा धर्म ओळखा
पाळी जो नियमास त्या फुका
इथली माती अद्दल घडवी मारी फाट्यावरी !!


इथे क्लिक करून गाणे ऐका !

चाल - सेतू बांधा रे

पुणेरी रहदारीवरून प्रेरित.  

सूचना -

पुण्याचा रहदारीचे हे वर्णन केवळ मजेत केलेले आहे.

हे वाचताना डोके फार "चालवून", मनाला लावून घेऊ नये.

-हुकुमावरून

Thursday, April 11, 2013

युगाब्द: ५११५



विजय संवत्सरारम्भः 
गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभमस्तु ते नूतन-संवत्सरम् 



लभेत बहु संपदन्न  विपदा कदा भाययेत् 
मनस्तु  शान्तं सुखी भवत्विति  शुभं चिन्तये |
जरामययुतं विचारकलिलं मनः खण्डयेत् 
भवेद्धि मधुना युतं हि धरणीपदं मङ्गलं  ||


मिळोत बहु संपदा न भिववो कधी संकटे 
मनास सुख शांती ती मिळून सर्व हो नेटके | 
जुनाट जर्जर विचार सगळे चला टाकूया 
शुभप्रद ठरो नवीन मधुपर्व पृथ्वीपदा ||

Wednesday, March 20, 2013

साहित्योत्सव-अष्टावली


अस्ति मध्ये भारतस्य राज्यं मध्यप्रदेश वै 
विपुलकृषिक्षेत्रेण तीर्थक्षेत्रैश्च शोभितम् ||1||

अवन्तिः कालिदासस्य महाकालपुरञ्च तत् 
नारायणगुरुस्थानं सान्दिपनीभिराश्रितम् ||2|| 

चतुरेकैकपञ्च(5114)तमे युगाब्दे पर्वसुन्दरं 
भाग्यमवन्तिभाषयोः साहित्योत्सवकारणात् ||3||


आयोजिताः प्राङ्गणे दशहराख्ये  प्रदर्शिनी ग्रामसभागारे 
अघोषयन् यत्र "सुर-लोक"तत्त्वं समुपेताः गीर्वाग्भाषमाणा: ||4||

अपि जनाः सहस्रशः समुपस्थिताः संस्कृताय वै 
गतपुस्तकमेलातः न्यूना संख्येति सत्यन्तु ||5||

तथाप्युपकोतिरुप्यकाणां ग्रन्थविक्रयणं अभूत् 
सगोष्ठीकार्यशालाभिः विशिष्योत्सव शोभितः ||6||

"अकादमी" कालिदासाभिधाना संगोष्ठीदायित्वमपूरयत् |
व्याख्यानचर्चाभिः संस्कृतेन अमन्त्रयन्तत्र अभ्यर्थिताः ||7||

मनांसि वै श्रोतृदर्शकानां, युवावर्गस्य विद्वज्जनानां 
तुष्टानि चकितानि प्रफुल्लितानि दृष्ट्वा चमूं ननु सुरवाग्वताम् ||8||