Friday, December 4, 2009

तो आणि "तो" च्या निमित्ताने


तो....तो हे सर्वनाम नाही. म्हणूनच मी "तो" च्या निमित्ताने, असं लिहिलंय, त्याने असं लिहिलं नाही. तो ही व्यक्ती नाही, समष्टी आहे !

पुलंचं "व्यक्ती आणि वल्ली" कितीही वेळा वाचता येतं, एखादी कविता परत परत वाचली की त्यातून जसं नवं नवं मिळत जातं, तसंच या पुस्तकाबाबत आहे. ते केवळ विनोदी पुस्तक नाही, व्यक्तींचं 'वल्ली' म्हणून संपूर्ण चित्रण त्यात आहे. हां आता 'विनोदाला कारुण्याची झालर' वगैरे खूप वर्णनं अनेक मोठ्या लोकांनी करून ठेवली आहेत।


"माणसांचे दोष दाखवण्यात लोक आपला वेळ वाया का घालवतात ते मला कळत नाही" असं पुलं म्हणाले होते. पण म्हणून पुलं फक्त अवाजवी कौतुक करत नाहीत. ते माणसांना चालतं बोलतं करून आपल्यापुढे उभं करतात. आता आपण कुठे नारायणाला भेटलोय, की पेस्तनकाकांबरोबर प्रवास केलाय ? (!) पण तरीही त्या माणसांना आपण अगदी जवळून "ओळखतो", ते फक्त पुलंमुळेच! ...... हं, असं बरंच वर्णन करता येइल पण..... पण हा लेख काही समीक्षेचा नाही !

मला हे वाचल्यावर आणि पुलंचं अभिवाचन पाहिल्या-ऐकल्यावर आपणही या व्यक्ती-वल्लींना खरंच "बोलतं" करावं, असं फार वाटायचं. आणि मग परत एकदा जेव्हा मी "तो" वाचला, तेव्हा मला राहवेना.

म्हणून मी "तो"ला बोलता करण्याचा प्रयत्न केला। पुलं हे शेवटी पुलं आहेत, माझ्याकडून तेवढी अपेक्षा मला नाही, (तुम्हीही करू नका! :P)

ह्या लेखाचं श्रेय संपूर्णपणे पुलंना !!!






("तो" पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली मधील आहेमी फक्त अभिवाचन केलय )