Monday, January 11, 2010

केल्याने भाषांतर

विश्वामित्रपराशरप्रभृतयो वाताम्बुपर्णाशना
स्तेSपी स्त्रीमुखपंकजं सुललितं दृष्ट्वैव मोहं गताः |
शाल्यन्नं सघृतं पयोदधियुतं ये भुञ्जते मानवा
तेषां इन्द्रियनिग्रहो यदि भवेत् विन्ध्यः प्लवेत्सागरे ॥
(८०, भर्तृहरी कृत शृंगार-शतक )

वायु-
पर्ण नि पाणी पिऊनी
वीरक्तीने जे जगती ;
त्यांचे चित्तही मोहून गेले
सुन्दर त्या ललनांवरती !!!
तूप-दूध-दही नित्य सेविती
जर चित्त अशांचे ना ढळले
खासच तर मग म्हणूया आपण
पर्वत जलधीवर तरले !!!

आपलं जुनं वाङ्मय केवळ त्यागवादी आहे या कल्पनेला छेद देणारा भर्तृहरी कृत शृंगार-शतक हा एक ग्रंथ आहे.
खूप दिवसांपासून शृंगारशतकातील भाषांतर करायचं डोक्यात होतं. आणि हे पद्य वाचल्यावर तर मला राहवेना. पण कित्येक दिवस या पद्याच समांतर पद्य जमत नव्हतं. त्यात छंद जपायचा छंद असल्याने चक्क मी कागद घेउन कविता "जुळवू " लागलो. पण छे! व्यर्थ !! मग शेवटी की बोर्ड वरच बसलो, आणि झालं .. भाषांतर तयार

3 comments: